महापरिनिर्वाण दिन : डॉ. आंबेडकरांच्या निधनावर काय म्हणाले होते पंतप्रधान पं. नेहरू?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. पंडित नेहरूंनी आपल्या भाषणात बाबासाहेबांबद्दल काय म्हटले (Nehru and Ambedkar), हे या महापरिनिर्वाण दिनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. – महापरिनिर्वाण दिन  Mahaparinirvan Din

  Read this article in English  

 यह लेख हिंदी में पढ़े 

Mahaparinirvan Din - महापरिनिर्वाण दिन
महापरिनिर्वाण दिन : Nehru On Ambedkar

महापरिनिर्वाण दिनी महामानवास विनम्र अभिवादन – जयभीम.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचा स्मृतिदिन हा ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी कोट्यवधी लोक त्यांना आदरांजली वाहतात तर लक्षावधी लोक त्यांचे समाधीस्थळ – चैत्यभूमी येथे जाऊन त्यांना नमन करतात.

बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी झाले होते, त्यानंतर त्यांचा पार्थिव देह दिल्लीहून मुंबईला आणला गेला व पुढच्या दिवशी 7 डिसेंबर 1956 रोजी चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला.

बाबासाहेबांचे निधन हे भारतीय इतिहासातली एक मोठी घटना होती, आणि भारतासह जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भारताच्या पंतप्रधानांनी देखील बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली होती, त्यावेळी ते नेमके काय म्हणाले होते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

त्यावेळी भारतातील सर्वाधिक शक्तिशाली आणि सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती हे पंतप्रधान पंडित नेहरू होते. 6 डिसेंबर 1956 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात – राज्यसभेत बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा राज्यसभेचे सदस्य (खासदार) होते, आणि खासदार असतानाच त्यांचे निधन झाले होते. राज्यसभेमध्ये पंडित नेहरुंचे संपूर्ण भाषण या लेखामध्ये दिलेले आहे.

बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली कळल्यानंतर नेहरूच्या मंत्रिमंडळातील मंत्री, खासदारही ‘26, अलिपूर रोड’ बाबासाहेबांच्या निवासस्थानी आले. स्वत: पंडित जवाहरलाल नेहरूही अंत्यदर्शनासाठी आले. माईसाहेब त्यांच्या ‘डॉ आंबेडकरांच्या सहवासात’ या आत्मचरित्रात लिहितात की, ‘नेहरूंनी माझे सांत्वन केले. साहेबांच्या वयाबद्दल, प्रकृतीबद्दल, आजारपणाबद्दल, कधी व कसे निधन झाले वगैरेची अत्यंत आस्थेने चौकशी केली. मी त्यांना सविस्तर माहिती दिली.’

आधुनिक भारताचा एक निर्माता आधुनिक भारताच्या दुसऱ्या निर्मात्याबद्दल काय म्हणतो, काय विचार मांडतो, हे या महापरिनिर्वाणदिनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पोस्टमध्ये शेवटी राज्यसभेच्या संकेतस्थळाचा अधिकृत संदर्भ देखील दिलेला आहे.

 

महापरिनिर्वाण दिन : Mahaparinirvan Din

पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर राज्यसभेत वाहिलेली श्रद्धांजली :

 

श्री. उपसभापती महोदय,

मला सभागृहाला कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की, अनेक बाबींमध्ये अग्रेसर भूमिका बजावणाऱ्या या सभागृहातील एका सदस्याचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. मी डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करत आहे. डॉ. आंबेडकर हे अनेक वर्षांपासून भारतीय सार्वजनिक घडामोडींमधील एक अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्त्व राहिले आहेत, परंतु त्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेबद्दल, त्यांच्या विद्वत्तेबद्दल आणि ज्या तीव्रतेने त्यांनी आपल्या मतांचा पाठपुरावा केला त्याबद्दल काही शंका नाही, काहीवेळा त्यापेक्षा जास्त तीव्रतेसह जे कदाचित विशिष्ट विषयासाठी आवश्यक आहे, जे कधीकधी उलट प्रकारे प्रतिक्रिया देते. पण ते त्या प्रखर भावनेचे प्रतिक होते ज्यास आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, भारतातील दडपल्या गेलेल्या वर्गाची ती तीव्र भावना होती, ज्यांनी आपल्या पूर्वीच्या सामाजिक व्यवस्थेत अनेक युगे भोगली आहेत आणि हे ओझे आपण सर्वांनी ओळखले आणि नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपल्यापैकी काहींना वाटले असेल की, त्यांनी त्या भावना व्यक्त करण्याचा अतिरेक केला आहे; परंतु मला असे वाटत नाही. उच्चार किंवा भाषेच्या पद्धती व्यतिरिक्त, कोणीही त्या बाबतीत आपल्या भावनांच्या तीव्रतेच्या योग्यतेला आव्हान दिले पाहिजे जे आपल्या सर्वांना जाणवले पाहिजे आणि कदाचित त्याहूनही अधिक ज्यांना स्वतःमध्ये किंवा त्यांच्या गटात किंवा वर्गात नाही याचा त्रास होत नाही. म्हणून, ते एक प्रतीक बनले. परंतु संसदेत आपण त्यांना इतर अनेक गोष्टींसाठी आणि विशेषत: आपल्या राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी लक्षात ठेवतो आणि कदाचित ही वस्तुस्थिती त्यांच्या इतर कार्यांपेक्षा जास्त काळ लक्षात राहील. मला खात्री आहे की या सदनाच्या प्रत्येक सदस्याला वाटेल की आपण त्यांच्या कुटुंबियांना आपला दीप शोक आणि सहानुभूतीचा संदेश पाठवावा आणि या निधनाबद्दल आपले तीव्र दु:ख व्यक्त करावे.”

 

 

संदर्भ : 

 

सारांश

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण Mahaparinirvan Din निमित्त पंडित नेहरूंचे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विचार (Jawaharlal Nehru on Dr BR Ambedkar) ही माहिती पाहिली. नेहरू आणि डॉ. आंबेडकरांची (Nehru and Ambedkar) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखाचे notification मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *