डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही प्रेरणादायी विचार आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार (dr babasaheb ambedkar thoughts in marathi) सर्वांनी आचरणात सुद्धा आणायला हवे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार
dr babasaheb ambedkar thoughts in marathi

आजपर्यंतच्या भारतीय इतिहासातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. अशा या महान विचारवंत असलेल्या बाबासाहेबांनी अनेक विषयांवर आपले विचार मांडलेले आहेत, त्यातील काही मराठी सुविचार मी येथे संकलित केले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार सर्वांनी समजून घेत आचरणात सुद्धा आणायला हवेत. – dr babasaheb ambedkar marathi quotes

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार (Dr Babasaheb Ambedkar Motivational Thoughts in Marathi)

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६) हे जागतिक दर्जाचे तत्त्वज्ञ वा विचारवंत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज केवळ एका समाजासाठी किंवा एका देशासाठी प्रेरणादायी ठरत नसून संपूर्ण जगासाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरत आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे २०व्या शतकातील जगातील सर्वात जास्त शिक्षित राजकारणी होते. गोलमेज परिषदा असो कि संविधान सभा असो त्यांमध्ये ते त्यातील सर्व लोकांमध्ये सर्वाधिक बुद्धिमान होते, असे अनेक विद्वान सांगतात.

आजपर्यंतच्या भारतीय इतिहासातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. अशा या महान विचारवंत असलेल्या बाबासाहेबांनी अनेक विषयांवर आपले विचार मांडलेले आहेत, त्यातील काही मराठी सुविचार मी येथे संकलित केले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार सर्वांनी आचरणात सुद्धा आणायला हवे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

(२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख धारण करू नका.

(३) स्वातंत्र्य विचारसरणीचे आणि स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !

(४) लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.

(५) शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

(६) लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

(७) मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे.

(८) मी संघर्ष करून अस्पृश्यांत जाज्वल स्वाभिमान निर्माण केला आहे.

(९) दैवावर [नशिबावर] भरवसा ठेवू नका. जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा.

(१०) अस्पृश्यता ही जगातील सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर व भिषण आहे.

(११) स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.

(१२) सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंतत:ही भारतीय ही भूमिका घ्यावी.

(१३) चारित्र्य शोभते संयमाने, आणि सौंदर्य शोभते शीलाने.

(१४) उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका.

(१५) माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.

(१६) करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.

(१७) शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

(१८) पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.

(१९) ग्रंथ हेच गुरू.

(२०) वाचाल तर वाचाल.

dr babasaheb ambedkar thoughts in marathi

(२१) इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे.

(२२) मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

(२३) तिरस्कार हा माणसाचा नाश करतो.

(२४) माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर पाण्यात जाता येईल.

(२५) एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.

(२६) भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.

(२७) धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.

(२८) लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे तर, लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती होय.

(२९) द्वेषाला सहानुभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.

(३०) बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.

(३१) बौद्ध धर्मामुळे भारत देश महान.

(३२) धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.

(३३) मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.

(३४) शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!

(३५) साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.

(३६) शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

(३७) विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.

(३८) सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.

(३९) सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.

(४०) अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

(४१) मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.

(४२) जगात म्हणे सहा विद्वान आहेत, आणि त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत, असे एक युरोपियन म्हणाले होते.

(४३) ज्यांच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.

(४४) बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत सुद्धा आहे.

(४५) भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अमर आहेत, पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता अन्य कोणत्याही धर्मात नाही.
(४६) सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.

(४७) बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.

(४८) बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.
(४९) शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

(५०) महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ती-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.

 

(५१) शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.

(५२) आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग?

(५३) हिंसा ही वाईट गोष्ट आहे, परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

(५४) नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा.

(५५) जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

(५६) वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे ही एक तपश्चर्या आहे. तिला मनः संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.

(५७) मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.

(५८) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

(५९) पती-पत्नीमधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.

(६०) जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

(६१) शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल, तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

(६२) तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

(६३) मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून करतो.

(६४) जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

(६५) प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.

(६६) मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

(६७) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

(६८) सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.

(६९) जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

(७०) स्त्री जात हा समाजाचा अलंकार आहे.

(७१) माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वतःला मोठा समजू लागला तर, तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.

(७२) कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.

(७३) बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

(७४) एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो, त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.

(७५) शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे, त्यामुळे जगभरातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती होत आहे. विद्यार्थी तसेच लहान मुलांसाठी हे मराठी सुविचार अधिक महत्त्वाचे आहेत.
Dr Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi

हे ही वाचलंत का?

डॉक्टर बाबासाहेबांचे विचार या पोस्टबद्दलची पार्श्वभूमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार” ही पोस्ट तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, ब्लॉग यासारख्या अनेक समाज माध्यमांवर आणि वेबसाइट्सवर कदाचित पाहिली असेल, वाचली असेल. परंतु या पोस्टचा निर्माता व संकलनकर्ता मी स्वतः [संदेश हिवाळे] आहे. मी ही पोस्ट 2016 मध्ये लिहिली होती, आणि तेव्हा मी ती फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत शेअर सुद्धा केली होती.

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जुलै 2016 मध्ये मी ही पोस्ट आपल्या Dhamma Bharat – धम्म भारत (तेव्हाचे नाव Buddhism in Maharashtra) या फेसबुक पेजवर टाकली होती. त्यानंतर मी स्वतःच्या फेसबुक खात्यावरून सुद्धा मार्च 2017 ला ही पोस्ट पोस्ट केली होती. खरं तर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झालेली आहे. मात्र पोस्ट शेअर करणाऱ्यांपैकी जवळपास सर्वांनीच पोस्ट खाली लिहिलेले माझे नाव खोडून टाकले, आणि यावर माझी विशेष हरकत नाही. परंतु काही लोकांनी यापुढेही जाऊन कहरच केला, त्यांनी पोस्टच्या शेवटी संकलनकर्ता किंवा निर्माता म्हणून स्वतःचेच नाव जोडले, जे की अत्यंत चुकीचे आहे. ही दुसऱ्याच्या कलाकृतीचे चोरी आहे. मी माझी जुनी पोस्ट जसाच तशी copy केली नाही तर, अनेक शब्दांचे शुद्धलेखन केलेले आहे.   

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

5 thoughts on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार

  1. Jay Bheem Dada बाबासाहेबांचे विचार आणि सुविचार हे मला खूप आवडले आहे प्रेरणादायी सुविचार आहे. तुम्ही चांगली पोस्ट लिहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *